अन्जीनेरी...किती जवळ होतं यार घरापासून म्हणजे अगदी १ तासाच्या अंतरावर पण बघा इतकी वर्षे झालेत
पण कधी पार नाही करता आलं. ह्यावेळी पण नाही जमणार म्हणून आशा सोडून दिली होती. कारण सकाळचे
११ वाजले होते पण घरीच होतो वाटलं होतं कि पोरं गेली असणार पुढे काल मी नाही म्हणालो म्हणून. काही
अपरिहार्य कारणे होती म्हणून नव्हतं जमणार, मित्रांना पण पटलं होतं ते. पण नाही हो ११वाजले तरी आले
सगळे घरी. पण घरात मला बोलवायला यायची कुणाची हिम्मत होयीना (थोडं समजलंच असेल तुम्हाला ) मग
काय घरी थोडा वादविवाद, शाब्दिक चकमकी, थोडा शब्दांचा कोटी क्रम आणि शेवटी मी निघालो. :)
पण कधी पार नाही करता आलं. ह्यावेळी पण नाही जमणार म्हणून आशा सोडून दिली होती. कारण सकाळचे
११ वाजले होते पण घरीच होतो वाटलं होतं कि पोरं गेली असणार पुढे काल मी नाही म्हणालो म्हणून. काही
अपरिहार्य कारणे होती म्हणून नव्हतं जमणार, मित्रांना पण पटलं होतं ते. पण नाही हो ११वाजले तरी आले
सगळे घरी. पण घरात मला बोलवायला यायची कुणाची हिम्मत होयीना (थोडं समजलंच असेल तुम्हाला ) मग
काय घरी थोडा वादविवाद, शाब्दिक चकमकी, थोडा शब्दांचा कोटी क्रम आणि शेवटी मी निघालो. :)
जरा पावसाचं वातावरण होतं, आणि त्र्यंबकेश्वर कडे तर कायम पाऊस असतो हे पण आम्हाला माहित होतं
स्त्याला लागलो. पावसाव्यतिरिक्त दुसरी काही अडचण वाटत नव्हती. सातपूरला फेमस 'अंबिका' मध्ये
नाश्तां पाणी केला. बरोबर वडा पाव घेतले. हरीने घरून भरपूर काही आणलच होतं. तिथे पोहोचण्यासाठीचा
रस्ता बऱ्यापैकी होता. लवकरच डोंगराच्या पायथ्याशी पोहोचलो. पण पुढे थोडा कच्चा रस्ता दिसत होता
म्हणून हळू हळू गाडी टाकली त्या रस्त्याने. फार लांब पर्यंत पोहोचून गेलो हो, म्हणजे अगदी अन्जीनेरीचा
खरा डोंगर चालू होतो त्याच्या पायथ्याशी. पूर्वी गाड्या खाली लाऊन ह्या रस्त्याने चालत यावं लागायचं. चला
थोडा तरी फायदा झाला. गाड्या लावल्या आणि लगेचच चढायीला सुरुवात केली.
अन्जीनेरी- म्हणजे 'रामभक्त हनुमान' यांच जन्म स्थाण. लहानपणा पासून खूप ऐकल होत यार ह्या जागे
बद्दल, तिथे असलेल्या हनुमानाच्या पायाने बनलेल्या तलावाबद्दल. हि जागा जितकी निसर्गरम्य आहे
तितकीच आपणासाठी पवित्र पण. आज ती बघण्याची इछ्या पूर्ण होणार होती.
सुरुवातीची वाट, सोपी वाटली. चांगल्या पायऱ्यांचा रस्ता होता. वर थोडं दूर पर्यंत जात असलेल्या दिसल्या.
स्त्याला लागलो. पावसाव्यतिरिक्त दुसरी काही अडचण वाटत नव्हती. सातपूरला फेमस 'अंबिका' मध्ये
नाश्तां पाणी केला. बरोबर वडा पाव घेतले. हरीने घरून भरपूर काही आणलच होतं. तिथे पोहोचण्यासाठीचा
रस्ता बऱ्यापैकी होता. लवकरच डोंगराच्या पायथ्याशी पोहोचलो. पण पुढे थोडा कच्चा रस्ता दिसत होता
म्हणून हळू हळू गाडी टाकली त्या रस्त्याने. फार लांब पर्यंत पोहोचून गेलो हो, म्हणजे अगदी अन्जीनेरीचा
खरा डोंगर चालू होतो त्याच्या पायथ्याशी. पूर्वी गाड्या खाली लाऊन ह्या रस्त्याने चालत यावं लागायचं. चला
थोडा तरी फायदा झाला. गाड्या लावल्या आणि लगेचच चढायीला सुरुवात केली.
अन्जीनेरी- म्हणजे 'रामभक्त हनुमान' यांच जन्म स्थाण. लहानपणा पासून खूप ऐकल होत यार ह्या जागे
बद्दल, तिथे असलेल्या हनुमानाच्या पायाने बनलेल्या तलावाबद्दल. हि जागा जितकी निसर्गरम्य आहे
तितकीच आपणासाठी पवित्र पण. आज ती बघण्याची इछ्या पूर्ण होणार होती.
सुरुवातीची वाट, सोपी वाटली. चांगल्या पायऱ्यांचा रस्ता होता. वर थोडं दूर पर्यंत जात असलेल्या दिसल्या.
आजूबाजू भरपूर/भरगच्च हिरवी झाडे होती, म्हणून जास्त पुढच काही दिसत नव्हतं. अश्या वाटांवर चालत
असतांना आपल्याला कायम कुतूहल वाटत असते कारण पुढे काय असणार याचा अंदाज करताच येत नाही.
थोड्याच पुढे ती घनघोर जंगलासारखी वाट संपली आणि आता उजवी कडे मोठा डोंगर आणि डावी कडे दरी
असा प्रवास चालू झाला.
वाट काहीच अवघड नव्हती. म्हणजे थोडी अरुंद होती इतकच. खर तर आल्हाददायक वातावरणात वाट कशी
सरते ते कळत नाही आणि सोबत सवंगडी असले तर काही विचारनच नको. सगळे खुश होतो. माकडांची
चांगलीच साथ लाभली होती (खरोखरच्या :)). सगळीकडे पसरलेले होते ते, आणि अस वाटायचं कि सगळे
आमच्या कडेच बघत आहेत. आमच्या मागून एक ७-८ जणांचा गुजराती ग्रुप येत होता. त्यात काही लेडीज
होत्या, एकीची पिशवी तिथे असलेल्या एका माकडाने जोरात हिसकवली. ती बाई इतकी घाबरली कि काय
सांगू. चांगलीच जोरजोरात रडायला लागली हो. बेशुद्ध पडते कि काय असं वाटत होतं सगळ्यांना (आणि
त्यांच्यातलेच काही लोक दात काढत उभे होते). वर जायची योजना रद्द करावी असे सूर उमटायला लागले होते.
असो. आम्हाला काय असं समजून आम्ही आमच मार्गक्रमण चालू ठेवलं.
असतांना आपल्याला कायम कुतूहल वाटत असते कारण पुढे काय असणार याचा अंदाज करताच येत नाही.
थोड्याच पुढे ती घनघोर जंगलासारखी वाट संपली आणि आता उजवी कडे मोठा डोंगर आणि डावी कडे दरी
असा प्रवास चालू झाला.
वाट काहीच अवघड नव्हती. म्हणजे थोडी अरुंद होती इतकच. खर तर आल्हाददायक वातावरणात वाट कशी
सरते ते कळत नाही आणि सोबत सवंगडी असले तर काही विचारनच नको. सगळे खुश होतो. माकडांची
चांगलीच साथ लाभली होती (खरोखरच्या :)). सगळीकडे पसरलेले होते ते, आणि अस वाटायचं कि सगळे
आमच्या कडेच बघत आहेत. आमच्या मागून एक ७-८ जणांचा गुजराती ग्रुप येत होता. त्यात काही लेडीज
होत्या, एकीची पिशवी तिथे असलेल्या एका माकडाने जोरात हिसकवली. ती बाई इतकी घाबरली कि काय
सांगू. चांगलीच जोरजोरात रडायला लागली हो. बेशुद्ध पडते कि काय असं वाटत होतं सगळ्यांना (आणि
त्यांच्यातलेच काही लोक दात काढत उभे होते). वर जायची योजना रद्द करावी असे सूर उमटायला लागले होते.
असो. आम्हाला काय असं समजून आम्ही आमच मार्गक्रमण चालू ठेवलं.
ती अरुंद पायवाट कापत, वर वर सरकत होतो आणि डाव्या बाजूला असलेल्या निसर्गाचा होतो. थोड वर
जाऊन आता उजवी कडे वळायचं होतं. त्या कोपऱ्यावर उभ राहून डावी कडे दरीच्या बाजूला असलेले
अप्रतिम दृश्य न्याहाळू लागलो. वातावरणात चांगलाच गारवा पसरलेला होता. दूर पर्यंत डोंगरांची रांग
पसरलेली होती आणि त्यांच्या पायथ्याशी घनदाट असे जंगल होते. खाली छोट्या छोट्या टेकड्या दिसत
होत्या हिरव्या गवताने मढलेल्या. डोंगरांचे आभूषण हेच... हिरव्या रंगांचे. किती आनंद होतो आपल्याला ते
पाहून, हिऱ्या मानकाची चमक फारच फिकी वाटते ह्यांच्या समोर. तिथे वाहणारा वारा पण किती आनंदी
वाटत होता, बेधुंध अश्वासारखा सगळी कडे पळत होता आणि हे हिरवे गवत त्याच्या तालावर नाचत होते
समुद्रातल्या असंख्य नाजूक लाटांसारखे. दरीच्या पुढच्या बाजूला काळ्या रंगाचे उंच असे डोंगर होते, पावसाने
त्यांच्या वरची सगळी धूळ धुवून त्यांना त्यांचा खरा रंग प्राप्त करून दिला होता. वाटले हि का एक रम्य नगरी
आहे? म्हणजे तसंच वाटत होतं. ते डोंगर समोरून सुरु होऊन अर्ध वर्तुळाकार फिरून पुढे पर्यंत पोहोचलेले.
थोडे दिसत होते आणि त्यांचा थोडा भाग धुक्याने वेढलेला होता. ते धुकं सोडतच नव्हतं त्या पर्वतांना. त्या
गार मिठीतून ते डोंगर मुद्दामून डोकं वर काढू पाहत आणि लगेचच धुक्याने त्याचा तो पण भाग व्यापून
घ्यावा. असाच खेळ चालू होता. कुठे एका काळ्या कुट्ट डोंगरावरून एक नाजूकसा धबधबा कोसळतांना दिसत
होता. जणू शुभ्र दुधाची धारच. आम्ही भरपूर आस्वाद घेतला त्या दृश्याचा.
जाऊन आता उजवी कडे वळायचं होतं. त्या कोपऱ्यावर उभ राहून डावी कडे दरीच्या बाजूला असलेले
अप्रतिम दृश्य न्याहाळू लागलो. वातावरणात चांगलाच गारवा पसरलेला होता. दूर पर्यंत डोंगरांची रांग
पसरलेली होती आणि त्यांच्या पायथ्याशी घनदाट असे जंगल होते. खाली छोट्या छोट्या टेकड्या दिसत
होत्या हिरव्या गवताने मढलेल्या. डोंगरांचे आभूषण हेच... हिरव्या रंगांचे. किती आनंद होतो आपल्याला ते
पाहून, हिऱ्या मानकाची चमक फारच फिकी वाटते ह्यांच्या समोर. तिथे वाहणारा वारा पण किती आनंदी
वाटत होता, बेधुंध अश्वासारखा सगळी कडे पळत होता आणि हे हिरवे गवत त्याच्या तालावर नाचत होते
समुद्रातल्या असंख्य नाजूक लाटांसारखे. दरीच्या पुढच्या बाजूला काळ्या रंगाचे उंच असे डोंगर होते, पावसाने
त्यांच्या वरची सगळी धूळ धुवून त्यांना त्यांचा खरा रंग प्राप्त करून दिला होता. वाटले हि का एक रम्य नगरी
आहे? म्हणजे तसंच वाटत होतं. ते डोंगर समोरून सुरु होऊन अर्ध वर्तुळाकार फिरून पुढे पर्यंत पोहोचलेले.
थोडे दिसत होते आणि त्यांचा थोडा भाग धुक्याने वेढलेला होता. ते धुकं सोडतच नव्हतं त्या पर्वतांना. त्या
गार मिठीतून ते डोंगर मुद्दामून डोकं वर काढू पाहत आणि लगेचच धुक्याने त्याचा तो पण भाग व्यापून
घ्यावा. असाच खेळ चालू होता. कुठे एका काळ्या कुट्ट डोंगरावरून एक नाजूकसा धबधबा कोसळतांना दिसत
होता. जणू शुभ्र दुधाची धारच. आम्ही भरपूर आस्वाद घेतला त्या दृश्याचा.
पुढे जात असतांना आता उजवी कडे परत पायऱ्या लागल्या. काही व्यवस्थित दगडाने रचलेल्या होत्या आणि
काही सिमेंटच्या. थोडी वळणे घेत त्या अगदी वर पर्यंत जात असलेल्या दिसल्या. खिंडीतल्या रस्त्या सारखा
वाटत होतं ते, म्हणजे दोन्ही बाजूला दगडी भिंती/कडे आणि मधून हि वाट. त्या पायऱ्यांवरून अगदीच स्वच्छ
आणि थंड पावसाचे पाणी खाली वाहत होतं. त्या पाण्याबरोबर खेळत आणि फोटो काढत पुढे चाललो होतो.
खूप वेळ त्या पायऱ्या चढत होतो, चांगल्या स्थितीत होत्या सगळ्या म्हणून विशेष असे काही कष्ट नाही पडले
त्यांना पार करण्यासाठी . वर जाता जाता ती खिंड जरा निमुळती होत गेली. शेवटच्या टोकावर पोहोचलो
आणि मग तिथून काढलेले हा फोटो.
खिंड संपली. त्या खिंडीतून चालतांना नक्कीच कोणत्या तरी विशेष ठिकानी चाललो आहोत अस वाटायला
लागलं. त्या रम्यनगरीतून निघून जणू काही स्वर्गात प्रवेश करत होतो असाच थोडा अनुभव आला. आता डावी कडे वळालो आणि पुढच्या मार्गाला लागलो. पुढचा मार्ग थोडा सोपा वाटला कारण आता दूर पर्यंत
बघू शकत होतो. दूर म्हणजे इतकं पण दूर नाही कारण हलक्या पावसाच्या सरी कोसळत होत्या आणि
त्यातल्या त्यात धुकं पण चांगलच पसरलं होतं.
काही सिमेंटच्या. थोडी वळणे घेत त्या अगदी वर पर्यंत जात असलेल्या दिसल्या. खिंडीतल्या रस्त्या सारखा
वाटत होतं ते, म्हणजे दोन्ही बाजूला दगडी भिंती/कडे आणि मधून हि वाट. त्या पायऱ्यांवरून अगदीच स्वच्छ
आणि थंड पावसाचे पाणी खाली वाहत होतं. त्या पाण्याबरोबर खेळत आणि फोटो काढत पुढे चाललो होतो.
खूप वेळ त्या पायऱ्या चढत होतो, चांगल्या स्थितीत होत्या सगळ्या म्हणून विशेष असे काही कष्ट नाही पडले
त्यांना पार करण्यासाठी . वर जाता जाता ती खिंड जरा निमुळती होत गेली. शेवटच्या टोकावर पोहोचलो
आणि मग तिथून काढलेले हा फोटो.
खिंड संपली. त्या खिंडीतून चालतांना नक्कीच कोणत्या तरी विशेष ठिकानी चाललो आहोत अस वाटायला
लागलं. त्या रम्यनगरीतून निघून जणू काही स्वर्गात प्रवेश करत होतो असाच थोडा अनुभव आला. आता डावी कडे वळालो आणि पुढच्या मार्गाला लागलो. पुढचा मार्ग थोडा सोपा वाटला कारण आता दूर पर्यंत
बघू शकत होतो. दूर म्हणजे इतकं पण दूर नाही कारण हलक्या पावसाच्या सरी कोसळत होत्या आणि
त्यातल्या त्यात धुकं पण चांगलच पसरलं होतं.
क्रमशः